Pages

सोमवार, १६ मार्च, २०२६

कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक konkan railway summer special

 कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक

konkan railway summer special


गाडी क्र.01171

कालावधी - 16 एप्रिल ते 11 जून 2026 पर्यंत ही गाडी दर गुरुवारी रात्री 12.20 ला मुंबई सीएसटी इथून सुटेल आणि मडगांव येथे 3.15 मी. पोहाचेल. ही आठवडा स्पेशल (weekly special) कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.

          तसेच गाडी क्र.01172 परतीचा म्हणजेच मडगाव येथून सायंकाळी 04.00 वा सुटेल आणि मुंबई सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी 3.45 मी. पोहोचेल.

          हया गाडीला पुढीलप्रमाणे स्टेशन थांबे आहेत. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, मडगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी.

एकूण 22 डब्यांची गाडी असून 2 Tier AC=1, 3Tier AC= 6, Sleeper = 9, General =4, SLR = 2

 

2) गाडी क्र.01119 लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते मडगाव जंक्शन Weekly special Holiday train

कालावधी – दि.17 एप्रिल 2026 ते 12.06.2026 दरम्यान दर शुक्रवारी मडगावहून दुपारी 04.00 वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वा. लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे पोहोचेल.

थांबे – ठाणे, पनवेल, पेण, रोहा, मडगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, आणि करमाळी

एकूण 21 डब्यांची गाडी आहे- ‍First AC 1, 2Tear AC = 3, 3 Tier AC = 7, Sleeper – 8, General = 2

गाडयांची बुकींग 17.03.2026 पासून सुरु होईल.

रविवार, १५ मार्च, २०२६

मनातलं गाव

 मनातलं गाव

मनातलं गाव


सद्या इराण, इस्त्राईल व अमेरिका अण्वस्त्र युध्द सुरु आहे. शहरांमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा झाल्याच्या बातम्या सतत चॅनेलवर सुरु आहेत. सोशल मिडीयावर मिम्स टाकल्या जात आहेत. अनेक हॉटेल बंद करावे लागले आहेत. तसेच उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काहीजण चुलीचा पर्याय म्हणून वापर करु लागले आहेत. अक्षरश: टाळेबंदी होण्याची वेळ आली असल्याचे संकेत मिळत आहेत.

            छोटया मोठया शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. सिलेंडर मिळाला नाही तर काय करायचे या विचाराने पहाटे ऊठून गॅस एजन्सी समोर रांगा लावून लोक उभे आहेत. काही ठिकाणी रांगा लावूनही सिलेंडर मिळत नसल्याने लोकांमध्ये आपापसात तंटे होताना दिसत आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी चुली पेटवायला सुरुवात केली. पण मोठमोठया सोसायटया आणि उच्चतम इमारती यांचे काय?

              हीच परिस्थीती कोरोनामध्ये आली होती. आपण कितीही विकासाची फुशारकी मारली तरीही परावलंबी आहोत हे वेळोवेळी सिध्द होत आहे. पैसा कमवण्यासाठी कितीही धावपळ केली तरी थकलेल्या जीवाला निवांतपणा हा गावातच मिळतो. ज्यांनी जन्मत: गावचं पाहिले नाही त्यांना नाही कळणार. पण ज्यांनी गावाचं जीवन अनुभवले आहे, त्यांना हयाची जाणीव आहे.

                तिकडे कोकणासारख्या हिरवळीत ग्रामीण जीवन मात्र नित्यनियमाने सुरु आहे. पुर्वीही होतं आताही आहे आणि पुढेही राहील. कारण कोकणातील खेडी स्वयंपुर्ण आहेत. म्हणजे इथे गरजा कमी आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेची स्पर्धा इतर जगाशी नाही. पोट भरण्यापुरते जेवण मिळतंय तेही स्वत: पिकवलेलं. वेगवेगळया ऋतुत तयार होणारा रानमेवा अर्धे पोट भरतो. मग अगदी नदी किंवा समुद्रातील मासे असोत किंवा जंगलातील करवंद, जांभूळ, आंबा, फणस, अळू, कण्हेरी, अटकं, नीवं अशी कितीतरी नावे आहेत.

               रानाता लाकूटफाटा आहे. मॉलची गरजच नाही.  गरजा सिमीत पण निसर्गाशी संलग्न. त्यामुळे अजुनही डोंगराळ भागात डॉक्टरांचे दवाखाने नाहीत. चायनीज, बेकरी पदार्थ, बाहेरचे जेवण, वातानुकुलीत एंत्रे, महागडे कपडे, श्रीमंतीचे प्रदर्शन, फुशारकी, हया गोष्टींना इथे थारा नाही. इथे फक्त निसर्गाच्या संपर्कात निसर्गाशी जुळवून घेत जीवन जगता येतं. खरचं जगता येत.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

सोशल मिडीया आणि आपण: ‘लाईक्स’ च्या दुनियेत हरवलेले आपले ‘लाईफ!’

 सोशल मिडीया आणि आपण: लाईक्स च्या दुनियेत हरवलेले आपले लाईफ!’

social media


           रस्त्याने जाता जाता एक मोबाईलचे स्क्रीन गार्ड विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्याकडे सद्या कोणीही गिऱ्हाईक नव्हते. आजुबाजूला लोक येत जात होते. तो खाली मान घालून बसला होता. मोबाईलमधील रीळ बघण्यात दंग होता. पुढे बघितल तर भाजीवाला भाजी गिऱ्हाईकाला भाजी पिशवीत भरता भरता भाजीवर ठेवलेल्या मोबाईलमध्ये रीळ बघत आहे. गिऱ्हाईकाला पटकन पळवण्याच्या मानसीकतेत. मनात विचार आला काय हे वेड लावून ठेवलंय संगळयांना. खऱ्याखुऱ्या जगापेक्षा त्यातील माणसापेक्षा आजकाल आपल्याला आभारी जगच अधिक प्यारे झालेय का?

             लहान मुलांपासून तर आजी आजोबां पर्यंत जो तो गुंतलेला. आजच्या डिजीटल युगात आपली सकाळ सुर्योदयाने कमी आणि व्हाटस्अप नोटीफीकेशनने जास्त होते. डोळे उघडल्या उघडल्या आपण देवाचे दर्शन घेतो की नाही माहित नाही पण मोबाईलचे दर्शन मात्र नक्की घेतो.

सोशल मिडीयाने जग जवळ आणले हे जरी खरे असले, तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला विसरत चाललो आहेात का? हा विचार करण्याची आता वेळ आली आहे.

1.      स्टेटसच्या नादात स्थिती विसरलो का? status

हल्ली एखादया छान हॉटेलमध्ये गेल्यावर पदाथ जिभेला लागण्यापूर्वी तो कॅमेऱ्यात कैद होतो. चव कशी आहे यापेक्षा फोटोला लाईक्स किती मिळतील, यातच आजचा आनंद सामावलेला दिसतो. तीच गत एखादया सुंदर ठिकाणी गेल्यावर तिथला आनंद उपभोगण्यापेक्षा फोटो आणि रीळमध्येच सगळे अडकलेले. आपण नक्की कोणासाठी जगतोय? स्वत:साठी की फॉलोअर्सना दाखवण्यासाठी?

2.      स्क्रॉलींगचे चक्रव्युह- scrolling

फक्त 5 मिनीटे रील बघतो असे म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी तासभर निघून जातो, हे कळतही नाही. प्रत्येकाला आयुष्य हे वेगवेगळे दिलेले आहे. जेवढे काही आयुष्य आहे त्यातील सुंदर क्षण अनुभवण्यापेक्षा हया आभासी जगासाठी आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत याची जाणीवही नसते. हे एक असे चक्रव्युह आहे ज्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला कठीण जात आहे. यामुळे आपली एकाग्रता कमी होत चालली आहे आणि कामाचा वेगही मंदावला आहे.

3.      तुलना: दु:खाचे मुळ कारण

दुसऱ्याचे फिरण्याचे फोटो, नवीन गाडी किंवा महागडे कपडे बघून आपल्याला वाटू लागते की आपलेच आयुष्य किती नीरस आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मिडीयावर प्रत्येकजण फक्त त्याचे बेस्ट व्हर्जन दाखवत असतो, पडद्यामागचा संघर्ष आणि दु:ख कोणीच पोस्ट करत नाही. सोशल मिडीयावर दाखविलेले व्हिडीओ खरच सगळे सत्य असतात का? मुळात व्हिडीओ का पोस्ट केला आहे? खरचं काहीतरी द्यायला की काहीतरी कमवायला?

4.    डिजीटल डिटॉक्सची गरज

मोबाईल पूर्णपणे सोडून द्या असे कोणीच म्हणणार नाही. पण दिवसाला काही वेळ नो गॅजेट झोन असायला हवा. कितीही म्हटले तरी जगा बरोबर जावंच लागतं. पण काही प्रमाणात आटोक्यात ठेवू शकतो ना. हे जग सोडण्यापूर्वी जे जे काही पहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे तो कधी घेणार. सतत मोबाईल वापरामुळे झोप अशांत होते. त्यामुळे काही सवयी आपल्याला लावून घ्याव्यात.

·         जेवताना मोबाईल बाजूला ठेवा

·         झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन बंद करा

·         आभासी मित्रांपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांना वेळ द्या

 

निष्कर्ष : social media

सोशल मिडीया हे एक उत्तम साधन आहे, जर ते मर्यादित वापरले तर! आपण सोशल मिडीयाचे मालक व्हायचे की गुलाम, हे आपल्याच हातात आहे. मोबाईल लॉक करा, बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा आनंद घ्या. कारण खऱ्या आयुष्यात फिल्टर्स नसतात, पण तरीही ते खूप सुंदर असते!

 तुम्ही दिवसातला किती वेळ सोशल मिडीयावर घालवता? कमेंटसमध्ये नक्की सांगा.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

अलार्मशी ‘कुस्ती’ की ‘मैत्री’ ? सकाळी लवकर उठण्याच्या 5 भन्नाट टिप्स!

 अलार्मशी कुस्ती की मैत्री’ ? सकाळी लवकर उठण्याच्या 5 भन्नाट टिप्स!

good morning
#marathitips #tipsoftheday 

                     “उद्यापासून पक्का 5 वाजता उठायचं! 

किंवा दरवर्षी अखेर संकल्प सोडतो, नविन वर्षात लवकर उठून व्यायाम सुरु करायचा. असं म्हणून आपण रात्री झोपतो. पण सकाळी 5 वाजता जेंव्हा अलार्म वाजतो, तेंव्हा आपलं मन आपल्याला हळूच सांगतं, अरे अजून 5 मिनिटं झोपला तर काय बिघडणार आहे? आणि ती 5 मिनीटं कधी 1 तासात बदलतात, हे आपल्याला कळतही नाही.

जर तुम्हीही अवस्था अशीच होत असेल, तर हे काही सोपे आणि प्रॅक्टिकलउपाय नक्की वापरून पहा:

1. अलार्म घडयाळ हाताच्या अंतराबाहेरठेवा

बहुतेक लोक मोबाईल उशीपाशी घेऊन झोपतात. अलार्म वाजला की डोळे न उघडता तो Snooze करणं सोपं जातं. त्याऐवजी, मोबाईल किंवा घडयाळ खोलीच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे पोहचण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावं लागेल. एकदा का पाय जमिनीला टेकले की झोप उघडण्यास मदत होते.

2. रात्रीचं जेवण आणि स्क्रीन टाईम

लवकर उठण्याचं रहस्य रात्रीच्या सवयीत दडलं आहे. हल्ली लोकांची दिवसाची सुरुवात आणि शेटव हा मोबाईलच्या वापरानेच होतो.

·         रात्रीचं जेवण हलकं आणि झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी घ्या.

·         झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईलचा निळा प्रकाश (Blue Light)  तुमची झोप पळवतो. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा. प्रेरणात्मक अथवा आरोग्याशी निगडीत पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यातील तमुच्या आवडीनुसार विकत घेऊन वाचू शकता. 


3. का उठायचंय?’ याचं कारण स्पष्ट ठेवा

उठल्यावर नक्की काय करायचं आहे, हे रात्रीच ठरवा. जर तुमच्याकडे काही ठोस कारण नसेल (उदा. व्यायामाला जाणं, वाचन करणं किंवा शांतपणे चहा पिणं), तर तुमचं मन तुम्हाला पुन्हा झोपायला प्रवृत्त करेल. सकाळी उठल्यावर मिळणारा तो मी-टाईम’ (Me-Time) खूप सुखावह असतो.

4. खिडकीचे पडदे थोडे उघडे ठेवा

सकाळचा नैसर्गिक प्रकाश जेंव्हा खोलीत येतो, तेंव्हा आपल्या शरीराला आपोआप जाग येण्याचे संकेत मिळतात. सूर्याची पहिली किरणं तुमच्या चेहऱ्यावर पडली की उठणं अधिक सोपं आणि उत्साहवर्धक होतं.

5. स्वत:लाशिक्षा नाही, बक्षीस द्या.

सकाळी लवकर उठणं ही शिक्षा समजू नका, बक्षीस द्या

सकाळी लवकर उठणं ही शिक्षा समजू नका, आज मी लवकर उठलो तर स्वत:ला आवडणारा नाश्ता करेन किंवा छान गाणी ऐकेन असं स्वत:ला सांगा, सकारात्मक विचारांनी उठल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.

थोडक्यात काय तर...

सकाळी लवकर उठणं ही एक सवय आहे, जी लागायला थोडा वेळ लागतो. पहिल्याच दिवशी यशस्वी झाला नाहीत तरी हरकत नाही, पण प्रयत्न सोडू नका, कारण, जो लवकर उठतो, तो जगाच्या दोन पावले पुढे असतो!

तुमचा अलार्म किती किती वेळा ‘Snooze’ होतो? कमेंटसमध्ये नक्की सांगा !


रविवार, ७ डिसेंबर, २०२५

मी कोण आहे?

 मी कोण आहे?

who i am

#motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment

          बऱ्याचदा गप्पा मारताना प्रत्येक जण एकमेकांविषयी, त्यांच्या स्वभावा विषयी बोलत असतो. आपले नातेवाईक, आपला बॉस, मित्र आप्तेष्ट, भेटणारे विविध प्रकारचे लोक. आपला नातेवाईक किंवा बॉस, प्रवासात, अपघाताने भेटणासरे लोक. किंवा गर्दीतले माणसे. भेटणारा व्यक्ती कसा आहे? याबद्दल आपण एकमेकांना आपले मत मांडत असतो. जसे की तो किंवा ती खुप दयाळू आहे. फ्री माईंडेड आहे. मदतगार आहे. इ. कधी कधी किंवा बहुतांशी त्या विरुध्द. म्हणजे तो किंवा ती फार रागीट आहे. स्वार्थी आहे. हेकेखोर आहे. हट्टी आहे. घमेंडखोर आहे. इत्यादी इत्यादी.

         समोरचाही त्याला दुजोरा देत असतो. अरे हो मला असा अनुभव आला किंवा हो ती तशी वागली. इ. समोरच्या माणसाचे मोजमापच आपण करीत असतो. हे झाले ओळखीच्या माणसांबद्दल. अनोळखी व्यक्ती भेटली कि, त्याची देहबोली, पोषाख, चेहऱ्यावरचे भाव यावरुन एक अंदाज बांधत असतो. की ही व्यक्ती अशी असू शकते. म्हणजे रागीट किंवा मैत्री पूर्ण. इ.

          हवा असलेला चेहरा समोर आला की आपलाही चेहरा खुलतो. अंगात उत्साह संचारतो. तेच नको असलेली व्यक्ती दिसली तरी हयाच्या एकदम विरुध्द घडते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकी व्यक्तीला आपण एक लेबल लावून टाकतो. एकदा लेबल लावले की त्याच्याशी/तिच्याशी कोणत्या प्रकारे बोलायचे हे ठरते. म्हणजे त्या व्यक्तीला दुखवून चालणार नसेल तर सांभाळून बोलावं लागते. तेच एखादयावर सुडच उगवायचा असेल तर मात्र मुद्दामहून आपण तसे बोलतो. म्हणजे व्यक्तीनुसार आपण कसे बोलायचे ते ठरवतो.

         पण कधी विचार केलाय का? आपण जसे प्रत्येकाला लेबल लावतो, तसे आपल्यालाही लेबल लागलेले असते. पण ते स्वत:ला कधीच दिसत नाही. कारण ते दुसऱ्याच्या मनात असते. मग आपण कसे आहोत? मी चांगला आहे कि वाईट आहे. इतर काय म्हणत असतील मलाअसे विचार येतात. कधी स्वत:चे परिक्षण केलय का? मी कसा/कशी वागतो/ते. माझे नातेवाईक, मित्र यांचे माझ्याबद्दल काय मत असतील?

        माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर माझा स्वभाव कसा आहे? मी खरच प्रेमळ आहे कि, रागीट आहे? मी आयुष्य एन्जॉय करतोय/तेय की, ढकलगाडी करतोय/करतेय. या जगात येण्याचा माझा उद्देश काय आहे? रोज उठून कामाला जुंपायचे, EMI फेडायचे की, दिवस मजेत घालवायचा? हया प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलात तर तुम्हाला तुमचा मी सापडेल? खरा मी. मीपणा नव्हे. ही गफलत नको.

CLICK HERE
                                                                               (Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

         मग त्यासाठी काय बरे करावे? एखादया शांत ठिकाणी बसून हया प्रश्नांची उत्तरे शोधा. काहीवेळ स्वत:साठी फक्त स्वत:साठी दया. तिथे कुणीही म्हणजे कुणीही नसेल. अगदी जवळची व्यक्ती सुध्दा नसेल. फक्त आणि फक्त स्वत:शीच संवाद. जिथे तुम्हाला शांत वाटेल. कुणीही डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी बसा. आणि सुरु करा स्वसंवाद. आज पर्यंत दुसऱ्यांना लेबल खुप लावली आता स्वत:साठी कोणते लेबल आहे ते पाहून घ्या. तुम्हाला तुमच्यातला मी भेटेल. जो कोणत्याही लेबलशिवाय जन्माला आला होता. जगात आल्यानंतर ईच्छा, अपेक्षांच्या ओझ्याखाली झुकलेला/लेली दिसेल. जेंव्हा जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा स्वत:मधील खरा मी शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा का तो मी सापडला तर त्याला काय आवडते? म्हणजे आपली आवड काय आहे तीही कळेल.

          रोज आपण एक बुरखा घेऊन वावरत असतो. म्हणजे एक आई किंवा बाप म्हणून. मुलगा/मुलगी, सुन, जावई, एक बॉस किंवा कर्मचारी म्हणून. एक मित्र किंवा एक सेल्समन. इत्यादी इत्यादी. अनेक बुरखे घेऊन आपण वावरत असतो. पण तो किंवा ती खरा मी नसतोच /नसतेच. खरा मी आत आत असतो जो शोधण्यासाठी खोलवर जावे लागते. लोकांसाठी असणारा मी आणि प्रत्यक्ष असणारा मी यात किती अंतर आहे. कि जसा मी आतून आते तसाच मी बाहेरच्या जागतही आहे. कोण आहे मी? निसर्गाचा एक घटक म्हणून की कसा आहे? कसं जगायला मला आवडेल? काय मला आवडेल? केवळ बाहय देखाव्या शिवाय असणार आतला मी कसा आहे? समजा माझ्यावर कोणतेही बंधन नाहीत, अपेक्षा नाहीत, ओझ नाही तर मी कसा असेल. काय गुण आहेत माझ्यामध्ये? काय अवगुण आहेत? रागीट आहे, तापट आहे. खरोखरच मी असा आहे का, कि हया जबाबदाऱ्या पेलता पेलता माझा स्वभाव बदलला आहे? बघा मिळतोय का  तुमच्यातला खरा मी’? सापडला तर तो जपा तुमच्यातच. 

            त्याच्याशी गप्पा मारा. त्याच्यावर नका लादू अपेक्षांचे ओझे. हया निसर्गाचा अविश्कार आहे तो, कोणत्याही लेबल शिवाय, कोणत्याही मोहमाया शिवाय, निरागस आणि निरपेक्ष. पुर्वी नाही का आपले ऋषी मुनी जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे. ते काय होतं. त्यांच्यातला मी चा शोधच तर होता. ज्ञान म्हणजे मी. स्वत:चे ज्ञान म्हणजे मी. असा मी प्रत्येकाला निवांत समयी सापडायला हवा. कारण जगासमोर वावरताना असलेला मी आणि आतुन असलेला खरा मी हयात अंतर आहे. आपली स्वत:ची ओळख हया मी मध्ये आहे. तो सापडला ना तर खुप बरं वाटेल. हलकं वाटेल. त्याचा तिरस्कार करु नका. त्याला झिडकारु नका. कारण तोच खरा मी आहे. बाकी सारे हया रंगमंचावरील मुखवटे आहेत. मुखवटयाखालचा मी तुम्हाला नक्की सापडेल. आणि भेटतच राहील. कदाचित लोकांना भेटलेला तुमच्यातला मी आणि तुम्हाला स्वत:ला भेटलेला तुमच्यातला खरा मी हया मध्ये खुपच अंतर असेल.


CLICK ON IMAGE

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंटस करा.    

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

 

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

watch


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

दैनंदिन जीवनात आपण घड्याळावर A.M. आणि P.M. हे शब्द पाहतो. परंतु त्यांचा अर्थ, फुल फॉर्म, इतिहास आणि या पद्धतीची सुरुवात कशी झाली हे अनेकांना माहित नसते. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

 A.M. आणि P.M. चे Full Form

A.M. = Ante Meridiem (दुपारपूर्वीचा वेळ)

P.M. = Post Meridiem (दुपारनंतरचा वेळ)

 A.M. म्हणजे काय?

A.M. हा दुपारपूर्वीचा वेळ दर्शवतो.

रात्री 12:00 ते दुपारी 11:59 पर्यंतचा वेळ A.M. मध्ये येतो.

 

P.M. म्हणजे काय?

P.M. हा दुपारनंतरचा आणि रात्रीचा वेळ दर्शवतो.

दुपारी 12:00 ते रात्री 11:59 पर्यंतचा वेळ.

 

A.M./P.M. पद्धतीची सुरुवात कशी झाली?

वेळ मोजण्याची कल्पना इजिप्तियन लोकांनी विकसित केली. त्यांनी दिवस 24 तासांत विभागला. नंतर रोमन साम्राज्याने दिवसाचे दोन भाग केले:

1. Ante Meridiem (A.M.)

2. Post Meridiem (P.M.)

 

Why A.M./P.M.?

पूर्वी 24-तासांची डिजिटल पद्धत नव्हती. दिवस आणि रात्र ओळखणे सोपे व्हावे म्हणून ही पद्धत वापरली गेली.

 

अंतिम सारांश:

A.M. = दुपारपूर्वी

P.M. = दुपारनंतर

ही पद्धत आजही जगभर वापरली जाते.

( CLICK FOR WINTER FASHION)



 


मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

Gold price hike सोने येवढे महाग का होत आहे?

 

gold price

सोने येवढे महाग का होत आहे?

          #goldprice #gold #golden #gold #jewelry 

  
         लाखाचा टप्पा पार करुन सोने 1,35000/- पर्यंत पोहोचले. त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर काही प्रमाणात खाली आले. सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर मोठया प्रमाणात परिणाम करणारे सोन्याबद्दल सोन्या सारखी माहिती.

सोने म्हणजे फक्त धातू नाही, तर श्रद्धा, सौंदर्य, गुंतवणूक आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. माणसाला सोन्याची मोहिनी हजारो वर्षांपासून आहे. प्राचीन संस्कृतींपासून ते आधुनिक अर्थव्यवस्थेपर्यंत सोनं नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे. भारतात लग्न सराईत सोन्याचा मोठा वाटा असतो. गरीब, मध्यम वर्गीय ते श्रीमंत साऱ्यांनाच सोन्याचे आकर्षण आणि रितीरिवाजा प्रमाणे सोने खरेदी करावे लागते. शुभ मुहुर्तावर सोने खरेदी बरकतीचे लक्षण मानले जाते.

 🧪 सोने म्हणजे काय?

- रासायनिक चिन्ह (Symbol): Au

- अणुक्रमांक: 79

- सोनं मऊ, लवचिक आणि गंज-प्रतिरोधक असतं.

- ते सहज वितळतं आणि पातळ शीट किंवा तारे बनवता येतात.

 🔥 सोने तयार कसे होते?

1. ज्वालामुखी आणि खडकांमधील नैसर्गिक प्रक्रियेतून सोनं तयार होतं.

2. खनिज खाणींमधून उत्खनन करून रासायनिक प्रक्रियेतून शुद्ध सोने मिळवलं जातं.

3. जुन्या दागिन्यांमधून आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून पुनर्वापर करूनही सोनं मिळतं.

 🧭 जगातील प्रमुख सोने उत्पादक देश

चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका आणि कॅनडा हे प्रमुख देश आहेत.

- चीन ~370 टन

- ऑस्ट्रेलिया ~310 टन

- रशिया ~300 टन

 💍 सोन्याची उपयुक्तता आणि वापर

1. दागिने: जगातील 50% सोनं दागिन्यांमध्ये वापरलं जातं.

2. गुंतवणूक: सोनं बार, नाणी, ETF स्वरूपात घेतलं जातं.

3. औद्योगिक वापर: इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यंत्र, अंतराळ उपकरणांमध्ये.

4. चलन आणि बँक रिझर्व: मध्यवर्ती बँका सोनं साठवतात.

 

💰 सोने महाग का आहे?

- मर्यादित उपलब्धता

- शुद्धता आणि टिकाऊपणा

- लोकांचा विश्वास

- उत्खननाचा खर्च

 🌏 जगातील सोन्याची मागणी

भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे सोन्याचे ग्राहक आहेत.

 

 भारत-  दागिने, सण, लग्न - ~700-800 टन

 चीन - गुंतवणूक, दागिने  ~600 टन

अमेरिका - गोल्ड ETF  ~250 टन

 🏦 भारतात सोन्याचं विशेष स्थान

- सोने म्हणजे महालक्ष्मीचं प्रतीक.

- धनत्रयोदशीला सोने खरेदी शुभ मानली जाते.

- भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक देश आहे.

 ⚖️ सोनं आणि अर्थव्यवस्था

- सोन्याचा दर वाढणे म्हणजे आर्थिक अस्थिरतेचं लक्षण.

- सोनं हे सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं.

 🌟 निष्कर्ष

सोने हे केवळ धातू नाही ते संस्कृतीचं, श्रद्धेचं आणि संपत्तीचं प्रतीक आहे.

त्याची चमक फक्त दागिन्यांत नाही, तर ती जगाच्या अर्थव्यवस्थेतही झळकते.

दिवसें दिवस महाग होत चाललेले सोने सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. त्यामुळे असे लोक सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांचा पर्याय शोधला आहे. कमी किमतीत अगदी अस्सल सोन्यासारखे दिसणारे दागिने महिला वर्गात अधिक पसंतीला उतरु लागले आहेत. किंमत कमी असल्याने सहज परवडत असल्याने नवीन नवीन डिजाईनचे दागिन्यांची खरेदी केली जाते. त्यामुळे कमी पैशात वेगवेगळया प्रकारचे दागिने वापरता येतात. इथे पाहू शकता.➤➤




कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक konkan railway summer special

  कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक konkan railway summer special timetable गाडी क्र.01171 काला...

आणखी पहा